भारतीय वैज्ञानिकांना आंध्रप्रदेश अनंतपुर मध्ये पृथ्वी वरील १५ दुर्मिळ घटक मिळविण्यात यश
भारतीय वैज्ञानिकांना आंध्र प्रदेश अनंत पुर मध्ये पृथ्वी वरील
दुर्मिळ १५ घटक मिळविण्यात यश मिळाले आहे पण अजून आपल्याला जमिनीमध्ये खोल खड्डे करून हे पहावे लागणार
कि हे घटक किती प्रमाणात आहेत आणि हे घटक मिसळ युक्त
तर नाही ना असो पण हि भारतासाठी आनंदाची बातमी आहे
आपण ज्यावेळी हे दुर्मिळ घटक जमिनीतुन काढतो त्यावेळी प्रदुषण होण्याची भिती असते महत्वाचे म्हणजे हे दुर्मिळ घटक दुर्मिळ नाहीत हे पृथ्वीवर बर्याच ठिकाणी मिळतात पण ते मिसळ युक्त असण्याचे प्रमाण जास्त असते
आणि मिसळ युक्त दुर्मिळ घटकामधुन स्वच्छ दुर्मिळ घटक बाजूला करणे अवघड प्रकिया आहे ज्यावेळी आपल्याला स्वच्छ दुर्मिळ घटक मिळाल्यावर आपण त्याचा उपयोग ह्या
बर्याच वस्तू बनवण्यासाठी करतो जसे कि दुर्बिण,फाइटर जेट,
रडार,बेटरी,टी.वी,गाडी,लेपटोप
स्वच्छ दुर्मिळ घटकांचा वापर हा जी वस्तू बनवणार त्या वस्तू मध्ये काही प्रमाणात करण्यात येतो
उदा.हया घटकांचा वापर लोखंड आणि स्टील मध्ये केला तर ते लोखंड मजबुत होणार
चायना सारख्या देशावर अनेक देश निर्भर
आहेत कारण चायना मध्ये स्वच्छ दुर्मिळ घटकांचे अनेक साठे
आहेत त्यामुळे असे स्वच्छ दुर्मिळ घटक आपण सरळ बर्याच
वस्तू बनवण्यासाठी वापरू शकतो
भारताला मिळालेल्या या यशामुळे चायना वरची निर्भरता कमी करता येईल पण अजुन म्हणावा तेवढा रस्ता सरळ नाही आहे कारण आपल्याला अजून साठा किती प्रमाणात आहे ते स्वच्छ आहे कि नाही पर्यावरणविषयी मंजुरी
मिळणे ह्या गोष्टी आहेत